आज्ञापत्रात म्हटलच आहे की, ‘आरमार हे स्वतंत्र राज्यांगच, ज्याचे आरमार त्याचा समुद्र’ हे यथार्थ वर्णन आज इतिहास अभ्यासकांच्य जिवाभावाचे आहे. आरमार म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो डौलदार नौकांचा समूह छत्रपती शिवरायांनी मराठा आरमाराची स्थापना हिरवा खर तर त्यापूर्वीही भारतात अनेकांची आरमारे होती. शिवरायांची नीती सांगणारे अमात्य म्हणतात, आरमार है स्वतंत्र राज्यागच! शिवरायांचं राज्य हे कोंकण किनारपट्टीला लागून असल्याने त्यांना या आरमारी ताकदीचा अंदाज येणं स्वाभाविक होतं नानासाहेब पेशवा तर आरमाराच्या बाबतीत म्हणे, आरमाराची मिळकत थोडी व खर्च फार आहे, म्हणून जरूर रवानगी करावे असे नाही. दृष्टिकोनात फरक कसा पडतो तर तो असा. छत्रपती शिवरायांच्या आरमाराचा दरारा होता. पहिल्यांदा हेटाळणी करणारे इंग्रज नंतर मराठ्यांनी बनवलेल्या नौकांचं कौतुक करताना दिसतात. शिवरायांच्या पश्चात आरमाराचे प्रमुखपण आंग्रेकडे आलं. सरखेल कान्होजी आयेंनी समुद्रावर आपला दरारा निर्माण केला आयेंचा कागदपत्रांचा विस्तार पाहिल्यास ती एक आग्रेशाहीच होती असं म्हणावं लागेल. पुढे आंग्रे यांच्या घरात वाद सुरू झाले, त्यातून एकाकडे विजयदुर्ग आणि दुसऱ्याकडे सुवर्णदुर्ग अशी वाटणी झाली. पुढे ह्या वादात पेशव्यांना उतरावं लागलं. पेशव्यांनी स्वतः आरमार उभं केलं. मानाजी आंग्रेची स्थापना आम्ही केली, पण त्याजपासून पैका काही मिळत नाही, असे चिमाजी आप्पाने म्हटले आहे. या वादातूनच पुढे धुळपांचा उदय झाला असे म्हटले तर वावगे ठरू नये. नानासाहेब पेशव्याने इंग्रजांची मदत घेत तुळाजी आंग्यांविरोधात युद्ध केलं. त्यात इंग्रजांना बक्कळ पैका व काही भूभागही मिळाला. स्वाभाविक, राष्ट्रीय इतिहासकारांना नानांची ही गोष्ट खटकली. यानंतर जनमानसात नानांनी मराठ्यांचं आरमार बुडवल, हा समज दृढ झाला. या पुस्तकाचा विचार करता नंतरच्या काळात धुळपांकडे आलेल्या आरमाराची सूत्रे आणि त्यांचा इतिहास पाहिला तर नानांवरचा हा आरोपा गळून पडतो. धुळपांचा इतिहास आंग्यांसारखाच पराक्रमी आहे याची जाण हे पुस्तक करून देतं. धुळप स्वारी करताना ‘हेट’ म्हणजे खाली, ‘उपर’ म्हणजे वर, ‘मावळण’ म्हणजे पश्चिम असा विचार करत. धुळपांच्या काळातही मराठा आरमार प्रचंड होतं, याची कल्पना हे पुस्तक वाचल्यावर येते. आमसुलाचे सरबत कोंकणात प्रसिद्ध आहे; याला २५० वर्षांचा इतिहास आहे, हे या पुस्तकातून समजतं. कोकण प्रदेशात आरमारी स्वारीच्या वेळी देवदेवताना तोफांचे बार काढण्याचे उल्लेख यात आहेत. नवस फेडण्यासाठी छोट्या तोफा दिल्या, अशी गमतीदार गोष्ट आहे. आरमारी नौकांची पुनर्बाधणी, त्यांचं व्यवस्थापन ह्या गोष्टी पुस्तकातून दिल्या आहेत. पूर्वी जखमा झाल्या तर औषध कसं बनवत वगैरे गोष्टी यात दिसतात याशिवाय अजून एक महत्त्वाची नोंद दिसते, ती अशी की, मराठा आरमार दिमाखात दिसावं, असं धुळपांना वाटे म्हणून आरमाराची तुलना ब्रिटिश आरमाराशी करून ते निशाण खाली लावतात, म्हणून आपणही आपले निशाण खाली लावावे, अशी परवानगी पेशव्याकडून घेतली. यातून हे समजतं की धुळपांना दिमाखही आवडे, या बदलासाठीही पुण्याची परवानगी घ्यावी, हे स्वामीनिष्ठेचे उत्तम उदाहरण आहे. आरमारी लढाईत दोन नौका एकमेकाना टक्करही देत असत. नौका दर्यागर्क झाल्याचे उल्लेख या पुस्तकात आहेत. असे असंख्य उल्लेख या पुस्तकात प्रथमच प्रकाशित होत आहेत, याचा मनस्वी आनंद वाटतो. इतिहास निव्वळ लढायांचा नसून अनेक अंगांचा त्यात विचार हवा, हे यातून सिद्ध होते. धुळपांनी केलेल्या लढाया पाहिल्यास त्यांचा पराक्रम प्रचंड होता, धुळपांनी समुद्रावर राज्य केलं, असं म्हणायला हे पुस्तक भाग पाडतं.
- शिवराम कार्लेकर, प्रस्तावनेतून!