सरखेल कान्होजी आंग्रे यांना केंद्रबिंदू कल्पून शिवशाही ते पेशवेकालीन राजनीती, लष्करी व आरमारी बळाबळ, पोर्तुगीज,इंग्रज व जंजिरेकर सिद्दी यांच्याबरोबरची धोरणे, आरमाराची रचना हा सर्व इतिहास, कान्होजींबरोबरच मराठा आरमाराचा उदय व विकास तसेच त्यानंतरचा झालेला अपकर्ष या पुस्तकात मांडलेला आहे. कान्होजीं अष्टपैलू व दमदार होते,उत्तम दर्यावर्दी म्हणून त्यांचा दरारा होता. परंतु दुर्दैवाने त्यांच्या वारसांत दुहीचे बीज पेरले गेले व अत्यंत कष्टाने उभारलेल्या मराठी आरमाराची धूळधाण झाली, हा सर्व इतिहास या पुस्तकात मांडलेला आहे.
Author Dattatray R. Ketkar gives detailed history of Sarkhel Kanhoji Angre who was navy chief during Maratha period. This book also describes how Maratha Navy was formed and then gradually declined. Information of Tukoji Angre and History of Angre Dynasty is also given.